Monday 23 January 2023

विद्यार्थी साहित्य संमेलन येणेगूर

गटशिक्षण कार्यालय, उमरगा, अभिजात साहित्य मंडळ व उमरगा व रोटरी क्लब ऑफ उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय, येणेगूर या ठिकाणी दिनांक १९ जानेवारी रोजी ५ वे विद्यार्थी साहित्य संमेलन संपन्न झाले.

 नववीत शिकणारा वेदांत संतोष पाटील हा अध्यक्षस्थानी होता. त्याचे अध्यक्षीय भाषण खूप छान व अभ्यासपूर्ण झाले. प्रसिद्ध साहित्यिक डॉ. शेषराव मोहिते यांनी या साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. संमेलन आयोजनामागची भूमीका प्रसिद्ध साहित्यिक श्री.बालाजी इंगळे यांनी प्रास्ताविकातून मांडली.

नंतरच्या सत्रात विद्यार्थी कविसंमेलन संपन्न झाले. ३० बालकविंनी कविता सादर केल्या. आजूबाजूच्या परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या कविता विद्यार्थ्यांनी सादर केल्या. कविता या विषयावर मुलांसोबत संवाद साधला. कविता कशी लिहावी,कवितेचे आकृतीबंध, बालसाहित्याचे वाचन करावे यावर चर्चा केली.नंतर कथानक सत्र संपन्न झाले.

विद्यार्थी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री.महेश हारके सरांनी त्यांच्या शाळेत साहित्य संमेलनाचे नेटके आयोजन केलेले होते. प्रसिद्ध साहित्यिक श्री.बालाजी इंगळे व अभिजात साहित्य मंडळाचे सर्व सदस्य यांनी खूप सुंदर नियोजन केलेले होते.

विद्यार्थी साहित्य संमेलन हा उपक्रम राज्यस्तरीय उपक्रम व्हावा असे वाटते.या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळतो. भाषिक अनुभव मिळतात. अध्ययन निष्पत्ती विकसीत होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकसनास मदत होते.

No comments:

Post a Comment