आमच्या शाळेच्या दुरूस्तीचे बांधकाम सुरू आहे. दुपारच्या सुटीची वेळ. ......
त्या कामावर असणारा एक कामगार अचानक माझ्याकडे आला.सडपातळ शरीरयष्टी, चेहर्यावर करूणेचा भाव. ....तो म्हणाला
" सर हित काय लेकराची सोय हाय का?"
"कशाची"
त्याच्या चेहर्यावर कशाचा तरी ताण दिसत होता. भांबवल्यागत आशाळभूत नजरेने तो विचारत होता.
" सर माझं पोरगं टाकलं असतं हीतं"
"कोणत्या वर्गात आहे मुलगा "
दुसरीला हाय भूम च्या शाळेत.मी ईट भट्टी वर काम करतोय. माझी बायको वारली. दोन लेकरं हायती ....पोरगी चौथीला हाय पोरगं दुसरीला. ...
हे ऐकून मलाही वाईट वाटलं. मग मुलीच्या शिक्षणाची काय व्यवस्था केली ते विचारलं.
पोरगी गावाकडं हाय. .म्हाताऱ्या आईवडीलाजवळ ती बी थकल्यात. कसंतरी सांभाळून घेत्यात.
हे सर्व सांगत असताना त्याच्या डोळ्यात अश्रू आले. मग तर मला खुपच वाईट वाटलं.
आपल्या शाळेला वसतीगृह नाही. तुम्ही एखाद्या आश्रमशाळेत मुलांना टाका. शाळेबद्दल माहीती मिळवतो असं सांगितलं.
मला नळदुर्गचं "आपलं घर "आठवलं .निराधार मुलांसाठी खुपच छान शाळा आहे. त्याबद्दल ही माहीती दिली.
"शेती वगैरे आहे का?" म्हटल्यावर ....
" नाही सर ....आमी कोळ्याचं,शेतीबिती कायी नाही. ...असंच काम करून खातूत...."
या अशा परिस्थितीत लेकरांच्या शिक्षणाचं काय होईल. ..हा प्रश्न मला सतावत होता.
नक्कीच काही शाळांची माहीती देईन...
ही मुलं शाळाबाह्य होणार नाहीत.
किती दुःख आहे समाजात. ..किती दारिद्र्य आहे
यात ह्या लेकरांचं आयुष्य होरपळून जातं.
No comments:
Post a Comment