जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राघुचीवाडी या शाळेत आज बालआनंद मेळावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान यावे. त्यांनी तार्किक विचार करावा. सहकार्यवृत्ती वाढीस लागावी. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा. यासाठी बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी बालआनंद मेळाव्यात भाजी मंडई भरविली होती. भाजी मंडई मध्ये विविध पालेभाज्या विकण्यासाठी आणल्या होत्या. शाळेतील विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. शाळेचे मैदान गजबजून गेले होते. पालकांनी बालआनंद मेळाव्यातील प्रत्येक स्टॉलला भेट दिली खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
बालआनंद मेळाव्यात आपल्या पाल्याचे कौतुक करण्यासाठी पालक, शालेय व्यवस्थापन समितीतीचे सदस्य, माता पालक संघाचे सदस्य, शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment